विविध गरजांशी संबंधित  नवीन बाबींना अटींनुसार परवानगी- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

जिल्ह्यातील लाॅकडाऊन मध्ये १७ मे पर्यंत वाढ


बीड जिल्ह्यात आजपासून लागू  झाले बदल  


बीड, ......... जिल्ह्यातील लाॅक डाऊन मध्ये  वाढ करण्यात आली असून विविध गरजांशी संबंधित  नवीन बाबींना त्यांचे पुढे नमूद केलेल्या दिनांकास अटींनुसार याद्वारे परवानगी देण्यात येत आली असून यासह ज्या बाबी सम आणि विषम तारखांना अनुज्ञेय होत्या त्या यापुढेही १७ में २०२० पर्यंत याच पध्दतीने सुरू राहतील. 
         
      या आदेशासह या पूर्वीचे सर्व मनाई आदेश दिनांक १७ मे २०२० रोजीचे रात्री १२ . ०० वा . पर्यंत लागू राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लागू केले आहेत. यानुसार बीड जिल्ह्यात आजपासून खालील बदल  करण्यात आले आहेत. 
      राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक 
कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २ , ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे . तसैच राज्य शासनाने संदर्भ क्रमांक १९ अन्वये दिनांक १७ में २०२० रोजी पर्यंत लॉकडारून बाबत केले आदेश निर्गमित आहेत .  या पूर्वीच्या सर्व आदेशान्वये लागू करण्यात आलेले आदेश या आदेशासह दिनांक १७ मे २०२० रोजीचे रात्री १२ . ०० वा . पर्यंत लागू राहतील .  या पूर्वीच्या सर्व आदेशाप्रमाणे ज्याबाबी सम आणि विषम तारखांना अनुज्ञेय होत्या त्या यापुढेही १७ में २०२० पर्यंत याच पध्दतीने अनुज्ञेय राहतील .


तसेच खालील नवीन बाबींना त्यांचे पुढे नमूद केलेल्या दिनांकास अटींनुसार याद्वारे परवानगी देण्यात येत आली आहे.


• शिवणकाम, कुंभार, लोहार चांभार,धोबी व प्रेस करणे, पेंटर, सुतार, इलेक्ट्रीशियन, प्लंबर तसेच भंगार रद्दी व्यवसायिक. तसेच ऑडीटर, शेअर ब्रोकर, सी.ए. यांनी व्यवसाय सुरु करण्यापूर्वी ज्या क्षेत्रात काम करणार आहेत त्या ठिकाणाच्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था (नगर परिषद/नगर पंचायत/ ग्रामपंचायत) यांची शिफारस पत्र घेवुन पास मिळवावेत. एल.आय.सी. एजंट यांनी त्यांच्या जिल्हास्तरीय मुख्य अधिकाऱ्यांकडून शिफारस पत्र घ्यावे आणि पारा मिळवून काम सुरु करावे. वरीलपैकी ज्यांचे कामाचे स्वरुप फिरते आहे त्यांनी पास घेवून दिवसभर दररोज पूर्ण वेळ काम करणेस हरकत नाही. तसेच वरील पैकी ज्यांचे काम त्यांचे दुकानात किंवा कार्यालयात होते त्यांना आपले दुकान/कार्यालय विषम तारखेस सकाळी ७.०० ते सकाळी ९.३० या वेळातच उघडता येईल. वरील व्यवसायिकांशी संबंधित साहित्यांची सर्व दुकाने सुद्धा विषम दिनांकास सकाळी ७.०० ते सकाळी ९.३० या काळातच उघडता येतील.


• सर्व ई-कॉमर्स कंपन्याना कोणत्याही वस्तूंच्या सेवा नियमाप्रमाणे देता येतील.


• बीड जिल्हयातील सर्व प्रकारचे खाजगी व शासकीय बांधकामे विषम दिनांकास सकाळी ६.३० ते सकाळी १०.०० ही वेळ वगळता सुरु करता येतील. यासाठी सर्व कर्मचारी/कामगार यांचेकडे मागील आदेशाप्रमाणे (दिनांक २३/०४/२०२०) नियंत्रक अधिका-याकडून शिफारस पत्र घेवून पास मिळविल्यानंतरच कर्मचाऱ्यांना कामावर घेता येईल. कोणत्याही परिस्थितीत स्थानिक कर्मचारी/कामगार यांनाच काम करण्यासाठी वापरण्यात येईल याची जबाबदारी संबंधित विभाग, मालमत्ताधारक व कंत्राटदार यांची संयुक्तपणे राहील.


• फेब्रिकेशन, इलेक्ट्रीकल साहित्य, होम अपलायन्सेस, फर्निचरची दुकाने, बेकरी, कन्फेक्शनरी ड्रायफूटची दुकाने, स्विट मार्ट, मिठाई भंडार ई. तसेच पूर्ण जिल्यातील सर्व वाहन दुरुस्तीची दुकाने आणि त्यासाठी लागणारे सर्व स्पेअर पार्टसची दुकाने विषम दिनांकास सकाळी ७.०० ते सकाळी ९.३० या काळात उघडी राहतील. सदरील दुकानदार यांनी त्यांचे कर्मचारी, स्वत:चा व दुकानाचा पास काढूनच दुकाने उघडावीत.


• सर्व प्रकारचे कपडे, भांडयाची दुकाने, चप्पल व बुट इ.दुकाने दिनांक ५,११ व १७ मे २०२० रोजी सकाळी ७.०० ते सकाळी ९.३० या वेळेतच उघडे राहू शकतील.


• विद्यार्थ्यांची शैक्षणिक पुस्तकांची दुकाने वगळता इतर सर्व पूस्तकांची व स्टेशनरीची दुकाने, कॉस्मेटीक्स. जनरल स्टोअर्सची दुकाने दिनांक o७ व १३ मे २०२० रोजी सकाळी ७.०० ते सकाळी ९.३० या वेळेत उघडी राहू शकतील.


• केशकर्तनालय चालक आणि ब्यूटी पार्लर चालक यांना आपले दुकान न उघडता केवळ ग्राहकांच्या घरी जावून सेवा देण्यास दररोज पूर्ण वेळ परवानगी देण्यात येत आहे. यासाठी त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील नगर परिषद/नगर पंचायत/ग्रामपंचायत यांचे शिफारस पत्र घेवून पास मिळवून मगच काम सुरु करता येईल. काम करतांना त्यांना सोबत कोणताही नेपकीन,टॉवेल इ. घेवून जाता येणार नाही. याबाबी त्यांनी ग्राहकांकडून उपलब्ध करुन घ्याव्यात. स्वत:चे सर्व साहित्य डेटॉल/ साबणाच्या पाण्याने स्वच्छ निर्जंतुक करुनच प्रत्येक ग्राहकासाठी वापरावे आणि मास्क/ जाड कपडा वापरुन स्वत:चे नाक व तोंड पूर्णपणे झाकलेले राहील याची खात्री करावी. त्यांना ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखी किंवा श्वसनाचा त्रास यापैकी कोणताही त्रास किंचीतही होत असेल तर त्यांनी स्वत:च्या घरीच थांबावे. त्यांनी कोवीड संबंधातील वैयक्तीक स्वच्छतेची काटेकोरपणे काळजी घ्यावी व सॅनिटायजरचा वारंवार वापर करावा.


• केवळ फळ विक्रेत्यांना शेतक-यांच्या शेतावर जावून फळे खरेदी करून शहरामध्ये फिरुन (एका जागी कोठेही थांबून न राहता तसेच कोणत्याही स्वरुपाचा होलसेल किंवा आडत बाजार न करता फळ विक्री करण्यास दररोज पूर्ण वेळ परवानगी देण्यात येत आहे. त्यांनी या विषयाच्या तालुकास्तरीय समितीकडे अर्ज करुन अशा प्रकारचा फळ विक्री परवाना मिळवून नेमून दिलेल्या क्षेत्रातच फळ विक्री करणे बंधनकारक राहील. तसेच शेतावर जावून खरेदी करुन फळे व भाजीपाला तालुका किंवा जिल्हयाबाहेर निर्यात करण्यासाठी (कोणत्याही स्वरुपाचा होलसेल किंवा आडत बाजार न भरवता) परवानगी देण्यात येत आहे.


• दिनांक १० मे २०२० पर्यत जिल्हयातील सर्व ११ शहरामधील सर्व दुकानदार व नागरीकानी (Needlly) हे होम - डिलेव्हरी अॅप (Home Delivery App) जे की, विना शुल्क सेवा देत आहे ते play store वरुन डाऊनलोड (download) करुन घ्यावे आणि या अॅप मधूनच लागणा-या साहित्याची खरेदी होम डिलेव्हरी स्वरुपात जास्तीत जास्त प्रमाणात करण्याचा प्रयत्न करावा. दिनांक १० मे पासून सर्व ११ शहरामधील कोणतेही किराणा दुकान विषम दिनांकास सकाळी ७.०० ते सकाळी ९.३० या काळामध्ये सुद्धा उघडता येणार नाही आणि दुकानानी होम डिलेव्हरीसाठी दिवसभर दररोज काम करणारी यंत्रणा तोपर्यंत कर्मचारी यांचे पाससह उभारावी, अशाच पध्दतीने ठराविक कालांतराने एकेएका प्रकारची ग्राहक उपयोगी वस्तूंची सेवा होम डिलिव्हरी प्रकारात पूर्णपणे समाविष्ट करुन इतर जिवनावश्यक नसलेल्या वरतूंची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येईल, जेणे करुन इतर उद्योगांना चालना मिळेल.
    जिल्ह्यात  आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपती यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना 
करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २ ( अ ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत .जिल्हयात फौजदारी प्रक्रिया  संहिताचे कलम १४४ ( १ ) ( ३ ) अन्वये दिनांक ३ में २०२० रोजीचे रात्री १२ . ०० वा . पर्यत मनाई आदेश लागू करण्यात आले होते त्या आदेशास यानुसार 17 मे 2020 पर्यंत वाढ देण्यात आली आहे .
०००००