.
मुखेड:.... -मुखेड तालुक्यात गेली 9 ते 10 दिवसापासून संततधार पावसामुळे मुग,उडीद व अन्य खरीप हंगामातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पाहणी करून विमा कंपनी व कृषी विभागाला पुढील आदेश देण्याची मागणी शेतकरी पुत्र श्रीकांत जाधव,संदीप कांबळे, योगेश जाधव यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
यावर्षी आवश्यक तेव्हा आवश्यक तेवढे पाऊस पडल्यामुळे खरीपांची पिके अगदी जोमात आली होती.परंतु मागील 9 ते 10 दिवस चालू असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या या आनंदावर विर्जन घातले आहे. हाताला आलेले मुगाचे पीक आडवे पडले असून मुगाच्या शेंगांना कोंब फुटले आहे. तर उडीद,सोयाबीन,कापूस व तूर ही पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. म्हणून माननीय तहसीलदारांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पीकविमा कंपनी प्रतिनिधी व कृषी विभागाला तात्काळ आदेश देऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी पुत्रांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शेतकरीपुत्र श्रीकांत जाधव,संदीप कांबळे, योगेश जाधव सह अन्य शेतकरी पुत्र उपस्थित होते.